रविवार, २१ जून, २०१५

वंजारी समाजाचे उभारते नेतृत्व : पंकजाताई

पंकजाताई मुंडे पालवे
पंकजा (चारूदत्त ऊर्फ अमित) पालवे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील परळी येथे झाला. त्यांचे शिक्षण बी.एस.सी., एम.बी.ए. (३ सेमिस्टर) झाले असून त्यांना एक मुलगा आहे. पंकजा पालवे भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. पंकजा पालवे यांना वाचन व सामाजिक कार्य यांचे छंद आहेत.

राजकीय कारकिर्द:-
पंकजा पालवेंच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात इ.स. २००९ साली झाली. त्यावेळी त्या बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघ मतदारसंघातून विजयी झाल्या. बीड लोकसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे नेते गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांच्या कन्या पंकजा पालवे निवडणुकीच्या प्रचारात उतरल्या होत्या. त्यांनी ३०० गावांमध्ये सभा आणि ४०० गावांना भेटी दिल्या होत्या. दुष्काळी परिस्थितीत निर्माण झाली असताना राज्यातील आघाडी सरकारने मात्र दुष्काळी जिल्ह्य़ांत बीडचा समावेश केला नाही म्हणून खासदार गोपीनाथ मुंडे यांच्यासह आमदार पंकजा पालवे मोर्चाचे नेतृत्व केले.

पेट्रोलचे दर लीटरमागे साडेसात रुपये वाढविल्याच्या निषेधार्थ परळी शहरात आमदार पंकजा पालवे यांनी बैलगाडीतून तहसील कार्यालयावर मोर्चा नेला होता.

परभणी महापालिकेच्या निवडणूक प्रचाराची धुरा आमदार पंकजा पालवे सांभाळली.  भाजपच्या पंकजा पालवे यांनी मराठवाडय़ातल्या वेगवेगळय़ा प्रश्नांवर विधिमंडळात आवाज उठविला. टंचाई सदृश परिस्थितीवरून विधानसभेत झालेल्या चर्चेत गुजरातमध्ये नर्मदेचे पाणी जलवाहिन्यांतून सौराष्टात नेण्यात आले. आपल्याकडे अशा पद्धतीने उपाय योजण्याची इच्छाशक्ती नसल्याची टीका पंकजा मुंडे यांनी केली. चारा व पाण्याच्या अभावी मराठवाडय़ात शेतकरी जनावरे स्वस्तात विकू लागल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्रातील वनक्षेत्राची पडीक, ओसाड जमीन अधिकाधिक वन लागवडीखाली यावी यासाठी खासगी संस्थांना वनक्षेत्र सात वर्षं लागवडीसाठी देण्याची योजना ३० वर्षांच्या भाडेपट्टय़ा पर्यंत वाढवावी अशी मागणी जुलै २००७ (नं. एफएलडी.१२०२/सीआर.१६८.एफ.१०) केली . केंद्र शासनाने पाच वर्षे उलटून गेली तरी राज्य शासनाच्या पत्रावर निर्णय दिला नाही. त्यामुळे ऑक्टोबर २००९ मध्ये आमदार पंकजा मुंडे यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केले . बीड जिल्हय़ातील अंबाजोगाई येथे योगेश्वरी मंदिरातील योगेश्वरीदेवीच्या मूर्तीवरील ३१ किलो सोन्याचे व तीन किलो चांदीच्या दागिन्यांची चोरी झाली.प्रकरणाचा छडा लावण्या करता पाठपुरावा केला.

सामाजिक कार्य:-
वैदनाथ सर्वांगीण विकास संस्थेमार्फत शाळा, महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले
महिलांच्या आर्थिक उन्नतीकरिता बचत गट स्थापन केले, त्या माध्यमातून महिलांना रोजगार व अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले
भटक्या, विमुक्त व इतर मागास समाजातील तसेच आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना सतत साहाय्य, ऊसतोड कामगारांच्या उन्नतीसाठीही प्रयत्न केले
संचालक, पंडित दीनदयाळ उपाध्याय सहकारी बँक व पन्नगेश्वर सहकारी साखर कारखाना लि
ऑक्टोबर २००९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवड
परदेश प्रवास
अमेरिकी, युरोप, अरब, फ्रान्स, सिंगापूर इत्यादी देशांचा अभ्यास दौरा

परळी रेल्वेस्थानकात हैदराबाद-औरंगाबाद या प्रवासी गाडीत आसनाखाली कपडय़ात गुंडाळून ठेवलेले पाच दिवसांपूर्वी जन्मलेले स्त्रीजातीचे अर्भक सापडले. या घटनेची माहिती मिळताच आमदार पंकजा पालवे यांनी रुग्णालयास भेट देऊन मुलीच्या उपचार व इतर खर्चासाठी आपण दत्तक घेतल्याचे सांगून या मुलीचे भाग्यश्री असे नामकरण केले.

स्त्री-भ्रूणहत्येस आळा घालण्यासाठी व मुलींचा जन्मदर वाढावा, या दृष्टीने समाजात प्रबोधन करण्यासाठी आमदार पंकजा पालवेनी पुढाकार घेतला . स्त्री-भ्रूणहत्येस पायबंद बसण्यासाठी आमदार पंकजा पालवे यांनी ‘लेक वाचवा, राष्ट्र वाचवा’ योजनेला सुरुवात केली आहे. मराठवाडय़ात स्त्री जन्माचे गुणोत्तर प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळेच आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी मराठवाडय़ात ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना वैद्यनाथ सर्वागीण विकास संस्थेच्या माध्यमातून सुरू केली. मराठवाडय़ातील मंदिरांमध्ये स्त्री-भ्रूण हत्येविरोधात जागर मोहीम राबविली 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा