रविवार, २१ जून, २०१५

वंजारी समाजाचा इतिहास- प्रा.बालाजी गंगाधर मुसळे

वंजारी समाज
वंजारी ही महाराष्ट्रातील हिन्दू धर्मातील एक जात आहे. सुमारे चारशे वर्षापुर्वी या समाजाने राजस्थानातुन येथे स्थलांतर केले. हा समाज मुख्यतः महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक गुजरात मध्यप्रदेश उत्तरप्रदेश छातीस्गड राजस्तान हरियाना पंजाब जम्मू काश्मीर व गोवा या भागांत कमी जास्त लोक्संखेने पसरलेल्या या जातीतील लोक प्रमुख ४ पोट जातीत विभागल्या मुळे एकता नसलेला पण भारतातील एक प्रमुख क्षत्रिय भटका समाज. भारतात व अन्य देशांतही आढळतो. वंजारी समाज हा महाराष्ट्र गुजरात मध्यप्रदेश उत्तरप्रदेश छातीस्गड राजस्तान हरियाना पंजाब जम्मू काश्मीर या राज्जात कमी जास्त लोक्संखेने आणि प्रमुख ४ पोट जातीत विभागल्या मुळे एकता नसलेला पण भारतातील एक प्रमुख क्षत्रिय भटका समाज.

 भारतात विविध राजांत सर्व समाजांसोबत मिळून मिसळून राहणारा शेतकरी पशुपालक समाज उपेक्षित राहिल्याने प्रगती थाबलेला समाज जाती व्यवस्थेचे चटके इतर क्षत्रिय समाजापेक्षा सर्वात जास्त सोसलेला समाज. या कारणाने आरक्षण मिळण्याने आज उभारत असेलेला समाज पण इतर क्षत्रिय समाजाकडून क्षत्रिय असूनही मान न मिळालेला समाज 
 वंजारी समाजाचा त्यागाचा शौर्य पराक्रमाचा इतिहास आहे वंजारी समाज हा क्षत्रिय वंश असेलेला पण देशोदेशी भटकंती करणारा बलशाली व कडवट लढाऊ गट आहे .महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा औरंगजेब भेटी वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वताच्या सोबत निवडक लोकांमध्ये वंजारी लोक निवडण्याचे कारणही हेच कि वंजारी समाज हा क्षत्रिय बलशाली व कडवट लढाऊ बाण्याचा आहे .तसेच राष्ट्रमाता जिजाऊ मां साहेबांच्या माहेरगावी शिंदखेड राजा परिसरातील हजारो वंजारी तरुण मावळे शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सहभागी होते . तसेच राजस्तानात महाराणा प्रताप जेव्हा दिलीच्या पातशहा सोबत एकाकी लढत होते तेव्हाही हाच वंजारी समाज तेथे आपले शौर्य पराक्रमाचा इतिहास उभारत होता कारण महाराणा प्रताप यांचे प्रमुख सरदार मल्ला व फत्ता वंजारी हे निष्ठेने लढत होते त्यांच्या समाध्या उदयपुर किल्ल्यात आजही उभ्या आहेत. वंजारी हा क्षत्रिय वंश असेलेला महाराणी दुर्गावती १० लाख बैल वापरून संपूर्ण भारतात विविध राजांना युद्धात दारुगोळा शात्स्त्रात व मीठ मसाला आनाधान्न्य पुरवठा करत आसे. क्षत्रिय वंश असेलेला पण देशोदेशी भटकंती करणारा वंजारी समाज हा तत्कालीन समाज धुरिणांनी भटका या बिरुदाने बाजूला टाकला व काळाच्या ओघात आपली मूळ ओळख विसरून एक उपेक्षित समाज म्हणून पुढे चालत गेला. आणि आजही उपेक्षित राहिला आहे 
 आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शोध लागण्यापुर्वी पुरातन काळापासुन ही मालवाहतुक/मालपुरवठा करणारा एक मोठा समाज होता ज्याला आपण महाराष्ट्रात वंजारी म्हणतो. फिरता व्यापार करणारे म्हणजे वण-चारी...याचेच रुपांतर "वंजारी" या शब्दात झाले असे एक मत इतिहासात डोकावुन पाहता दिसते. या आद्य मालवाहतुकदारांचा...मालपुरवठादारांचा इतिहास पुरातन तर आहेच पण मानवी जीवनाला तेवढाच उपकारक ठरलेला आहे.
 पुरातन काळी भारतात अरण्ये खुप होती. बैलगाड्या जावू शकतील असे फार रस्तेही नव्हते. भारत हा एक खंडप्राय देश. भुगोलही विचित्र. प्रचंड पर्वतरांगा. अलंघ्य नद्यांची रेलचेल. क्वचितच रहदारी करता येतील असे नाणेघाटासारखे घाट...पण ते बैलगाड्यांना अनुपयुक्त. बरे एका राज्यातील माल दुस-या राज्यांतील नागरिकांच्या गरजांसाठी/व्यापा-यांसाठी वाहतुक यंत्रणेची गरज तर होतीच. सिंधु संस्क्रुतीच्या कालापासुनच भारतात नैसर्गिक ते कृत्रीम बंदरे बनु लागली होती. या बंदरांतुन विदेशात माल निर्यात केला जायचा तसाच आयातही केला जायचा. हा बंदरांपर्यंत पोहोचवणे ते आयात माल देशात इच्छित स्थळी पोहोचवण्याची सुविधा नसती तर या आयात-निर्यातीचे काम अशक्यप्राय असेच होते.
  हे तत्कालीन सुविधांचा पुरेपुर अभाव पाहता विविध समाजघटकांतील ही गरज पुरी करायला पुढे आले. बैलगाड्यांचा उपयोग नसल्याने बैलांचा मोठ्या प्रमाणावर मालवाहतुकीसाठी वापर करायला सुरुवात केली. कापडांचे तागे, धान्य, मीठ, मसाले सैन्यासाठी दारुगोळा असे पदार्थ बैलांवर शिस्तशीर लादुन ते वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवले जावू लागले. तिकडुन तेथील माल लादुन आनला जावू लागला. त्याचबरोबर हे वंजारी स्वत: व्यापारही करत.
  आजचे घाट, रस्ते हे मुळच्या वंजारी मार्गांवरच बनले आहेत. या मार्गांवरुन एकेक वंजारी कुटुंब शेकडो बैलांचे तांडे घेवून देशभर मालवाहतुक करत असत. वाटेत चोर-दरोडेखोरांच्या धाडी पडण्याच्या घटना नित्य असल्याने प्रतिकारासाठी मूळचाच क्षत्रिय लढवैय्या वंजारी समाज सज्ज होता. मुळ व्यवसायच भटक्या स्वरुपाचा असल्याने आणि विविध जाती-जमातींशी, अगदी परकिय व्यापा-यांशीही नित्य संपर्ज येत

२९ टिप्पण्या:

  1. या लेखात फक्त वंजारी समाजाची पार्श्वभूमी सांगितली ....डीटेल माहिती सांगितली तर बरे होईल सर् .....

    उत्तर द्याहटवा
  2. प्रिय वंजारी बांधवानो,
    जय सेवालाल!
    मी एक बंजारा समाजाचा व्यक्ती आहे,मी आपनांस सांगू इच्छितो कि माझ्या सर्वेक्षणानुसार बंजारा आणि वंजारी समाजाचा किमान महाराष्ट्रात तरी सांस्कृतिकदृष्ट्या काहीही संबंध नाही, आम्ही लोकांनी आत्तापर्यंत आमची राजस्थानी संस्कृती सोडलेली नाही, आमच्या सर्व प्रथा सुद्धा पूर्वीप्रमाणेच टिकून आहेत, आमचे गोत्र आणि आमचे नाव व आडनाव सुद्धा आमची राजपूत संस्कृती दर्शवतात जसे राठोड, चौहान, राणावत, पवार(परमार), शेखावत. आमची संस्कृती हि अतिप्राचीन सिंधू संस्कृतीमधून उदयास आलेली आहे.आमचे थोर पुरुष,

    गुरू सेवालाल, वसंतराव नाईक, महाराजा सवाई मानसिंह, लाखासिंह बंजारा, आला उदल, जंगी भुकिया,माखनशाह बंजारा, श्री रामदेवरा, रणजितसिंह नाईक, सुधाकरराव नाईक,....यादी खूप मोठी आहे.

    तरी आपणांस नम्र विनंती आहे कि आपण तुमच्या वंजारी समाजाचे नाव आमच्या बंजारा समाजसोबत जोडून चुकीचा इतिहास सांगू नये...आमच्या समाजाचा इतिहास मी या पुढील पोस्ट मध्ये टाकत आहे, कृपया यापुढील पोस्ट देखील वाचावी.....

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अगदी खरी प्रतिक्रिया दिली आहे, वर सांगितलेला इतिहास मतलब हवेत गोळीबार आहे.

      हटवा
    2. Tasa sangnyachi aamla garaj pan nahiye....aamala Kahi aamchi ijjat kami Karun ghyaychi nahi

      हटवा
    3. Tumchya sarkha feku kaam karat nahiye..tumchya sobat history jodlya mule vanjari samajachi ijjat kami hoil..

      हटवा
    4. सर आपण महनताय ते आगदी खरे आहे पण वंजारी समाजाच्या एका तरी मानसाने आपल्या समाजाशी नाते जोडले आहे असे एखादे उदाहरण दिले तर बरे होईल, कारण आपल्या समाजाच्या चालीरिती आम्ही सगळे रोजच बघतोय.

      हटवा
    5. चव्हाण सर आपण बरोबर सांगत आहात. प्रामाणिकपणे मान्य करायचे असेल तरआमच्या समाजाचा खरा इतिहास अजून उलगडलेला नाही म्हणून वंजारी व बंजारा समाजाचा इतिहासाची सरमिसळ केली जाते. राजस्थानातील सर्व शासकीय जातींच्या नोंदी असलेली कागदपत्रे शोधली(इंटरनेट वर) परंतु त्यामध्ये कुठेही वंजारी जात आढळत नाही. आंध्र व तेलंगणामध्ये वंजारी हे obc मध्ये आहेत पण राजस्थानात नाहीत मग आम्ही राजस्थानातून आलो ह्याचा उलगडा होत नाही पण वंजारी लोकांच्या दिसण्या वरून राजस्थानि असण्याची दाट शक्यता वाटते.. वंजारी भाषा(पालघर भागात बोलली जाते ) ही पण गुजराती/राजस्थानी धाटणी ची आहे

      हटवा
    6. आम्ही वंजारी मराठी आहोत आम्ही महाराष्ट्रात तुम्च्या खुप शतके आधी आलोय आणी अम्हाला आमच्या मराठी संस्कृती चा जास्त अभिमान आहे.

      हटवा
    7. वंजारी ही बंजारा समाजातून निघालेली जात आहे आणि हे समाज आदिवासी आहेत दोघी पण आणि भिकरचोत सारखे राजपूत म्हणू नका राजपुतान पेक्षा आपले समाज खरे लढवये होते राजपुतानि मुघलाना मुली दिल्या आपण त्याला विरोध केला आहे आपण जंगलात राहणारे भटकंती करणारे शूर समाज आहोत

      हटवा
  3. भारत की सबसे सभ्य और प्राचीन संस्कृती सिंधु संस्कृती को माना गया है। इसी संस्कृती से जुड़ी हुई गोर- बंजारा संस्कृती है और इस गोर बंजारा समाज का वास्तव पुरी दुनियाभर में है और उन्हें अलग अलग प्रांत में अलग अलग नाम से जाना जाता है। जैसे महाराष्ट्र में बंजारा, कर्नाटक में लमाणी, आंध्र में लंबाडा पंजाब में बाजीगर, उत्तर प्रदेश में नायक समाज और बाहरी दुनिया में राणी नाम से जाने जाते है। इस समाज के इ.स.पुर्व काल में बौद्ध और महावीर के भी पहले पीठागौर नाम के गौरधर्म के संस्थापक हुए है। इसके बाद ग्यारवी शताब्दी में दागुरु नामके द्वितीय धर्मगुरु होके गये है। द्वितीय धर्मगुरु ने शिक्षा का महत्व और मंत्र और समाज को दिया। वो मंत्र गोरबोली में शिकच शिकावच शिके राज धडावच, शिके जेरी साजपोळी, घीयानपोळी, इसका मतलब जो समाज शिक्षा प्राप्त करके अपने समाज को शिक्षीत करता है। वहीं समाज राज वैभव प्राप्त कर सकता है इसका उदा. पीठागौरने चंद्रगुप्त मौर्य, हर्षवर्धन जैसे महान विराट राजा को जन्म दिया। उसी तरह दागुरु के विचारों ने आला उदल, राजा गोपीचंद जैसे महान योद्धा वो को निर्मीत किया। इसी 12 वीं शताब्दी से लेकर 17 वी शताब्दी तक गौर बंजारा समान में बड़े बड़े योद्धा होके गये। जैसे महाराणा प्रताप के सेनापती जयमल फंतीहा और राजा रतनसिंग के सर सेनापती और राणी रुपमती के सगे भाई गोर बंजारा गौरा बादल। 16 वी और 17 वी शताब्दी के गौर बंजारा समाज के महान व्यापारी, उत्तर में लकीशों बणजारा और दक्षिण में जंगी, भंगी (भुकीया) और मध्यभारत के भगवानदारस वडतीया थे। ये सभी व्यापारी भारत के बड़े राजा-महाराजाओं को रसद (अनाज) पहुंचाने का काम करते थे। लेकिन आम जनता की फिकर इस गौर बंजारा समाज के संत सेवाला महाराज को थी, इसलिए उन्होंने आम जनता की सेवा और भलाई के लिए अपने विचारों का संघटन निर्माण किया और उनका नेतृत्व भी किया, उसी महान सतगुरु, समाजसुधारक, क्रांतीकारी, अर्थतज्ञ, आयुर्वेदाचारी और बहुजनों के (कोर-गोर) के धर्मगुरु संत सेवालाल का जन्म 15 फरवरी 1739 को आंध्रप्रदेश के अनंतपुर जिले के गुथ्थी तालुकास्थित गोलाल डोडी गांव में हुआ। अभी वो गांव सेवागड के नाम से जाना जाता है। भौगोलीक और ऐतिहासिक जानकारी होने के कारण गोर बंजारा समाज का वास्तव्य प्रदेश की सीमाओं पे ज्यादातर होता था इस स्थिथीयों का फायदा उन्हें व्यापार में मिलता था और संघटन की दृष्टी से भी लाभदायक था इसी बात से उनके दुरदृष्टीका अंदाज होता है।
    सेवालाल के पिताजी रामजी नायक के सुपुत्र भिमा नायक बहुत बड़े व्यापारी थे। उन्हें लगभग भारतीय सभी भाषाओं का ज्ञान था। उनकी कुल संपत्ती में 4000 से 5000 तक गाय और बैलों का समावेश था। जिसका उपयोग अनाज की यातायात के लिए किया जाता था और वो 52 तांडों के (गांव) के नायक थे। उन्हें नायकडा कहा जाता था (1 गांव का नायक और 52 गांव के नायकडा) एक गांव (तांडे की) की आबादी लगभग 500 के आसपास होती थी। हर तांडे के लिये एक पुरुष और एक स्त्री गोर धर्म प्रचारक के रुप में काम करते थे, उन्हें बावन्न (52) भेरु (पुरुष) और 64 जोगंणी (स्त्री) कहते थे। इन 52 भेरु और 64 जोगणी का एक संघ होता था। और ये मुख्य नायकडा के अंतर्गत कायम करते थे। इसीलिए संत सेवालाल के दादाजी को रामसंघ नायक कहते थे। (52 तांडो का संघप्रमुख) भिमा नायक भी 52 तांडों के संघप्रमुख थे। ऐतिहासिक दस्तावेज से पता चला है की, भिमा नायक ने अंग्रेजों के साथ मुल्य 2 लाख रु. का व्यापारी करार किया था। (अनाज पहुचाने का करार) इस बात से साफ पता चलाता है की, सेवालाल का जन्म वैभव सपन्न घर में हुआ था। इसके अलावा उनके जन्म को लेकर काफी सारी मिथ्या कहानियाँ सुनने में आती है। सेवालाल की माँ का नाम धरमणी था जो कि जयराम बड़तीया (सुवर्ण कप्पा, कर्नाटक) की सुपुत्री थी। भिमा नायक के विवाह के उपरांत लगभग 12 साल तक उन्हें कोई संतान नहीं थी बाद में मरीया माँ के आराधना के बाद संत सेवालाल का जन्म हुआ ऐसी अस्था है।

    उत्तर द्याहटवा
  4. संघ के पारंपारिक निती के नुसार स्वरक्षा और अनाज की रक्षा के लिए यौद्धाओं की निर्मीती की जाती थी। उसी को ध्यान में रखते हुए सेवालाल ने 7 संघटनायकों का एक संघटन बनाया जिसमें खुद सेवालाल, उनके तीन भाई, हापा बदु, पुरा और धर्मी, ढाका, रामसंग साथ भीया थे। इसी संघटन को बाद में 6 संघ नायकों ने अपनाया। इस तरह 13 लोगों का एक महासंघ बना? जो 700 तांडो का नेतृत्व करता था जिसमें मध्यभारत, दक्षिणभारत का समावेश था। मध्यभारत के व्यापारी भगवानदारस वडतीया कुलसंपत्ती 2 लाख बैल) और दक्षिभारत के व्यापारी जंगी, भंगी भुकीया (कुलसंपत्ती 2 लाख बैल) सेवालाल के संघ में समाविष्ट हुए। 17 वी शताब्दी की राजकीय स्थिती के अनुसार हम यह कह सकते है, की, अंग्रेजी सत्ता का प्रभाव और ताकत दिन ब दिन बढ़ता जा रहा था और भारतीय राजाओं की व्यवस्था कमजोर होती जा रही थी। अंग्रेजी हुकूमत का गोर बंजारा व्यापारी पर राजाओं को रसद पहुंचाने के खिलाफ दबाव बढ़ते जा रहा था। और अंग्रेज प्रभावित इलाकों में गोर बंजारा व्यापारीयों से कर वसुली का फर्माण निकाले जा रहे थे जो की, गोर बंजारा के व्यापारी नियमों के खिलाफ था।इस कर वसुली के खिलाफ प्रस्ताव लेकर सेवालाल अपने सभी संघ नायकों के साथ निजाम से मिलने गये। अंग्रेजी हुकूमत के डर से निजाम ने इस प्रस्ताव को ठुकरा दिया इसके मद्देनजर सेवालाल ने निजाम के विरुद्ध युद्ध का ऐलान किया। फिर (बंजारा हिल) हैद्राबाद में युद्ध हुआ और परिणामस्वरुप निजाम ने सेवालाल की सभी शर्ते मंजुर की और भारत के अन्य राज्यों के करप्रणाली के लिए दिल्ली के बादशाह गुलाम खान को मिलने की सलाह दी। सेवालाल ने निजाम की सलाह मान ली और निजाम की ओर से दिये हुए सम्मान को स्वीकार किया। सम्मान के तौर पर निजाम ने ताम्रपत्र, तलवार और भेटवस्तू दी। पोहरागढ मंदिर (महाराष्ट्र राज्य) में आज भी ये भेटवस्तुयाँ मौजूद है।
    दिल्ली के बादशाह गुलाम खान ने इस प्रस्ताव को नामंजुर किया, परिणाम स्वरुप सेवालाल ने युद्ध का ऐलान कीया, गुलाम खान के 25000 सैनिकों का मुकाबला सेवालाल के 900 यौद्धाओं ने किया। गुलाम खान की भारी हार हुई इतिहासकारों ने इस युद्ध का जिक्र कभी नहीं किया। गुलाम खान ने करप्रणाली को माफ करने को मंजुर किया। व्यापार दृष्टीकोन से सेवालाल की ये बहुत बड़ी राजनैतिक जीत थी। इस जीत के चलते सेवालाल का नाम पुरे भारत वर्ष में प्रसिद्ध हुआ। लाहोर के गौरबंजारा (ट्रेडर्स) ने सेवालाल को सम्मानित किया। जयपुर (राजस्थान) के बंजारा व्यापारी और बहुजन लोगों की पुकार पर सेवालाल ने भुमिया नामक दहशतग्रस्त का शिरच्छेद किया और राजस्थानवासियों को भुमिया से मुक्ती दिलाई। आज भी इसी निशानी के तौरपर जयपुर में सवाई मानसिंग हॉस्पीटल में सेवालाल का मंदीर है। दिल्लीस्थित रायसिना हिल लकीशों बंजारा ने सेवालाल के स्वागत में बनाई हुई छत्री नेहरु प्लॅनिटोरियम, नई दिल्ली में मौजूद है। इसी तरह मुंबई के पास सेवानामक गांव में जहापर अभी जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट है वहां पर 17 वीं शताब्दी में सेवालाल पोर्ट हुआ करता था। वैसे ही धरमतर (सेवालाल के सहयोगी) नाम का पोर्ट रायगड जिल्हे में पेण के पास मौजुद है। उसी तरह मुंबई स्थित भाऊचा भी ना होते हुए वो सेवाभाया का धक्का है। इस जगह पर पोर्तुगीज का जहाज फस गया था उसे सेवालाल ने निकाला, फलस्वरुप उन्हें मोतीयों की माला (इटालियन पर्ल्स) दिया गया, इसी वजह से सेवालाल मोतीवाळो के नाम से भी जाने जाते है। रायगड जिल्हे में पेण के पास गागोदे नामक गांव में सेवालाल का व्यापारी केंद्र था वहां पर आज भी उनके नाम का मंदीर मौजूद है। सेवालाल बहुत बड़े व्यापारी, यौद्धा, संगटक, अर्थतज्ञ तो थे ही लेकिन उसके साथ वे बहुत बड़े समाजसुधारक थे। सेवालाल की ताकत और ग्यान का पता इसी बात से लगाया जा सकता है कि जो भविष्यवाणीयां सेवालालने भारत की सामाजिक और आर्थिक और नैसर्गित स्थिती को लेकर कहीं थी वो सब बाते आज 250 साल बाद सच हो रही है।

    उत्तर द्याहटवा
  5. बाहेर राज्यात आपल्या जातिच नाव काय आहे

    उत्तर द्याहटवा
  6. सर वंजारी समाजाची उदय क्रांती कुठून आहे आणि याचे गोत्र काय आहे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. सर वंजारी(NT-D)व बंजारा/लमाण(VJNT) पूर्णपणे वेगवेगळ आहे.राजकारण्यांनी राजकीय स्वार्थासाठी या दोन्ही एकच जाती भासवल्या.16 व्या शतका नंतर राजस्थानातून काही राजपूत, क्षत्रिय व्यापारासाठी उत्तरेकडे आहे याठिकांची संस्कृती स्विकारली. नंतर वनात राहणारे2 म्हणून वंजारी नाव पडले. प्रत्यक्षात वंजारी हा शुद्ध राजपूत वंशी समाज आहे.जय राजपुताना.... जय महाराणा...

      हटवा
  7. वंजारी व बंजारा या निश्चितच वेगळ्या जाती आहेत . वंजारी हे मुळचे राजपूत किंवा जाट असावेत व खुपच अगोदरपासून महाराष्ट्रात स्थलांतरित झाल्याने त्यांची मुळ संस्कृती व भाषा बदलुन महाराष्ट्रीय झाली असावी . मात्र ते बंजारा निश्चितच नाहीत .

    उत्तर द्याहटवा
  8. महाराष्ट्रात त्यांना वंजारी हे नाव मिळाले त्यांची अनेक आडनावे ही जाटांच्या आडनावांचा अपभ्रंश आहेत .

    उत्तर द्याहटवा
  9. https://en-m-wikipedia-org.translate.goog/wiki/Talk:Vanjari_(caste)?_x_tr_sl=en&_x_tr_tl=hi&_x_tr_hl=hi&_x_tr_pto=nui,tc,sc

    उत्तर द्याहटवा